निराशा तरी… आशाही!

(हा मजकूर आत्मरुदन किंवा आत्मपीडन नाही तसेच, हा परपीडेतून आनंद घेण्याचाही प्रयत्न नाही तर, एक भूमिका घेऊन मी ज्या व्यवसायात सुमारे साडेतीन दशकापेक्षा जास्त काळ आनंदाने घालवत आहे त्या पत्रकारितेचा घेतलेला आत्मपरीक्षणात्मक वेध आहे. या लेखनाचा रोख प्रामुख्याने प्रकाशवृत्त वाहिन्या, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील साखळी आणि विभागीय पातळीवरील मध्यम वृत्तपत्रांकडे …

गडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी !

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अगदी अपेक्षेप्रमाणे कौल दिला आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्याला आलेला असला तरीही तो बहुमतापासून लांब आहे. शिवसेना दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा गुगली टाकलेला आहे. मतदारांनी संमिश्र कौल दिल्यावर जशी …

मुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना

राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर म्हणजे १९९५ नंतर युती-आघाडीचे सरकार गेल्या १९ वर्षांपासून अनुभवयाला मिळते आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोन सत्तास्थाने असतातच असा अनेकांचा समज झालेला आहे. आमची पिढी पत्रकारितेत आली तेव्हा राज्याचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख केवळ मुख्यमंत्रीच असे. त्याला अपवाद दोन, एकदा नासिकराव तिरपुडे आणि …

काऊंट डाऊन…

माणसे तीच असली तरी त्यांच्या राजकारण आणि संसारिक आयुष्यात कोणतीच समानता नसते. संसारात कधी-कधी कडू-तुरट धुसफुस असते, आंबट-गोड असंतोष असतो, नाते न तुटू देणारी घुसमट असते. या घुसमटीला कधी कधी तोंड फुटते. मग पती-पत्नीत एकमेकाची उणीदुणी काढणारे जोरदार भांडण होते. एकमेकावर केलेल्या प्रेमाची पश्चातापदग्ध कबुलीही बिनदिक्कत दिली जाते आणि त्याच …

पुन्हा एलकुंचवार !

( महेश एलकुंचवार यांनी ९ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला तेव्हा लिहिलेला लेख . ) पुन्हा एलकुंचवार ! //१// १९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा होता. युद्ध नुकतेच संपलेले होते, त्याचा ताण म्हणून महागाईचा तडाखा बसलेला होता, त्यातच दुष्काळ आणि भ्रष्टाचारविरोधी उभे राहिलेले …

आहे बजबजपुरी तरी…

इलेक्ट्रॉनिक्स मिडियात होणा-या चर्चात सहभागी होणे कटाक्षाने टाळत असलो त्या माध्यमातील अनेक पत्रकार चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याशी माझा नियमित संपर्कही असतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर या माध्यमातील एक तरुण पत्रकार गप्पा मारताना म्हणाला, ‘काय बजबजपुरी माजली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नाही का?’ मी त्याला म्हटले, ‘युती आणि आघाडीत …