माणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…
१९७२चा दुष्काळ अनुभवलेल्या पिढीतील मी एक आहे. अंग भाजून काढणारी उन्हें, सतत कोरडा पडणारा घसा, कधी तरी मिळणारे अत्यंत गढूळ पाणी, खायला अमेरिकन लाल मिलोच्या भाकरी, मिलो मिळणे मुश्कील झाल्यावर राज्य सरकारने सुरु केलेले सुकडी हे खाद्यान्न, रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडी फोडणारे लोक आणि याच खडीचे ओळीने रस्त्यालगत लागलेले ब्रास… …