काळीज कुरतडवणा-यांचा महाराष्ट्र…

* पालन-पोषण करणं अशक्यच झालं म्हणून अगतिक झालेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं त्याची बैलजोडी एकही छदाम न घेता समोरच्याच्या हवाली केली – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली आहे. * पाणी नाही, चारा नाही म्हणून गेल्या दोन वर्षात खंगलेल्या जर्सी गायींनी शेवटचा श्वास घेतल्याचं …

हवे आहेत, अंधाराची तहान लागणारे…

//१// वर्तमानाच्या मानगुटीवर इतिहास कायम विराजमान असतो आणि जुनं काही तरी उकरून काढून तो वर्तमानाला छळत असतो, असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय गेला आठवडाभर महाराष्ट्रात जे काही घडलं त्यातून आला. महाराष्ट्रात जे दुहीचं वातावरण गेला आठवडाभर निर्माण झालं ते काही वर्तमानाला कायम प्रेरणा देणाऱ्या इतिहासातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वप्नातही …

बिहारी फटाके !

निवडणुका जाहीर होण्याआधी आणि दिवाळी बरीच दूर असताना बिहारात फटाके फुटायला लागले आहेत. अर्थातच हे फटाके राजकीय आहेत. विकासाचे तथाकथित गुजराथी मॉडेल घेऊन देश चालवणारे नरेद्र मोदी आणि सर्वच बदलौकिकाच्या गटारगंगेतून बिहारला शुद्ध करणारे नितीशकुमार हे दोघे सध्या राजकीय फटाके फोडण्यात आघाडीवर आहेत आणि बिहारातील लढाई या दोघातच झाडणार आहे. …

कर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण !

‘मेरी मुर्गी की एकही टांग’ अशी एक म्हण लहानपणी मराठवाड्यात अनेकदा ऐकायला मिळायची, या म्हणीचा अर्थ ‘माझंच म्हणणं खरं आणि त्यासाठी कितीही एकारली भूमिका घेण्याची वृत्ती’ असा होता. याच वृत्तीची लागण आपल्या देशाच्या पुरोगामी-प्रतिगामी, डाव्या-उजव्या, सरळ-वाकड्या अशा वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालणाऱ्या बहुसंख्याना झालेली आहे, किंबहुना आपल्या देशातील राजकारणाचे ते एक …

दिलखुलास आणि ऐटदार गवई…

सत्तेच्या दालनात प्रदीर्घकाळ पत्रकारिता करताना अनेक नेत्यांना भेटता आलं.त्यात रा. सू. गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर सर्वात प्रथम आठवला तो त्यांचा पानाचा डबा.. लगेच त्यातील केशराचा गंधही दरवळला. रा. सू. गवई यांचा लवंग, विलायची, जर्दा, केशर असलेला पानाचा …