वसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा !
बालवाडी, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात मिळालेल्या ज्ञानाच्या कक्षा जगण्याच्या शाळेत व्यापक होतात, जगतानाच आकलनाच्या कक्षा विस्तारतात. जगण्याच्या शाळेतलं शिक्षण टोकदार, वास्तवदर्शी, सुसंस्कृतपण जोपासणारं, माणुसकीला उत्तेजन देणारं आणि बहुपेडी अनुभवांनी माणसाला समृद्ध करणारं असतं. जन्मल्यावर पहिल्या श्वासापासून हे जगण्याच्या शाळेतलं शिक्षण सुरु होतं आणि जगण्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत या शाळेत आपणच …