शुभ शकुनाच्या ओल्या रेषा!

//१// आसाराम लोमटे, अक्षयकुमार काळे, अनिल पिंपळापुरे या यार-दोस्तांना वर्ष सरता सरता मोठे सन्मान मिळाले; आनंद विश्वव्यापी झाला. २०१६नं भरल्या मनानं निरोप घेतांना येणारं नवीन वर्ष अशा अनेक आनंददायी बातम्यांचं असेल अशा जणू शुभ संकेताच्या ओल्या रेषाच आखल्यासारखं वाटलं. १९९८च्या मी महिन्यात माझी महिन्यात ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात बदली झाली तेव्हा …

दानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा!

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तीनही टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून ‘मनातल्या मनात’ किंवा ‘जनतेच्या मनात’ असलेले राज्य भारतीय जनता पक्षातील बहुतेक सर्व इच्छुक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आता बाहेर पडले आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, हे सर्व ‘हिट विकेट’ झालेले आहेत. नुकतीच ‘क्लीनचीट’ मिळालेल्या पंकजा मुंडे, मग विनोद तावडे, नंतर एकनाथराव खडसे यांनी …

एकाच माळेचे मणी!

देशाच्या सांसदीय राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते मन उद्विग्न करणारं आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून ‘मला संसदेत बोलू दिलं जात नाही’ असा टाहो फोडला जातोय. लोकशाही म्हणजे संवादातून चालणारं सरकार, हा आजवरचा समज पूर्णपणे चूक कसा आहे, हेच सिध्द करणारा आरोप-प्रत्यारोपांचा कोलाहल माजलाय; संसदेचा मासळी बाजार …

वसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…

वैयक्तीक आणि सार्वजनिक अशा दोन पातळ्यावर वेगवेगळं आयुष्य एकाच वेळी जगावं लागलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक मिथक वसुंधरेच्या कुशीत कायमचं विसावलं आहे. गॉसिप नाही पण, जयललिता यांचं वैयक्तीक आयुष्य असमाधान आणि अतृप्ततेचा चीरदाह होता: शापित सौंदर्यवती असंही त्यांना म्हणता येईल. मात्र एक अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून …

बच्चा नाही, अब बडा खिलाडी!

राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळलेल्या महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पहिल्या फेरीच्या निकालावर भाजप आणि त्यातही प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. ही निवडणूक बरीचशी निमशहरी आणि काहीशी ग्रामीण भागातील जनतेचा कौल असल्यानं भारतीय जनता पक्षानं आता निमशहरी भागातही पाळंमुळं घट्ट केली आहेत असं म्हणायला हरकत नाही. देवेंद्र …

अडाण्यांचा कल्ला!

चलनातील ५०० आणि १००० रुपये मूल्यांच्या नोटांबाबत निर्णय झाला त्यादिवशी महाबळेश्वरला होतो. त्यानंतर हा मजकूर लिहेपर्यंत म्हणजे, गेल्या १७ दिवसापैकी सात दिवस प्रवासात आहे; तेही रस्ता मार्गे आणि कारने. सोबत १०० रुपयांची रोख कमी आणि क्रेडीट कार्डवर भर असा मामला. कुठेही ‘मी पत्रकार आहे’ किंवा सोबतच्या दोस्तयाराने तो ‘डॉक्टर आहे’ …

लेट मी जॉईन द मेजॉरिटी….

“कोणाला हे मृत्युपूर्व डोहाळेसदृश्य रुपक वाटेल, कोणाला ती एक सांकेतिक कथा भासेल तर कोणाला समकालाविषयी व्यक्त झालेली ती अस्वस्थता वाटेल. नैराश्य डोकावतंय-नकारात्मकता आहे त्यात, असंही काहीना वाटू शकेल. बहुसंख्यांना मात्र तो आपणच व्यक्त केलेला एक पारदर्शी संवेदनशील हुंकार आहे, असं वाटेल, इतका सच्चेपणा त्यात आहे” आपण एका विलक्षण शांत, अत्यंत …

मी-मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर

सुरुवात आणि पूर्णविरामही, सहजच! (‘स्मिता स्मृती’च्या २०१६च्या अंकासाठी मंगलाने लिहिलेला हा लेख आहे. जवळ जवळ सातवर्षानी काही तरी लेखन मंगला केलं!) आमची बदली १९९८साली औरंगाबादला होईपर्यंत म्हणजे; जन्म ते वयाची पंचेचाळीशी पार करेपर्यंत मी पक्की नागपूरकर. धंतोलीतून वसंत नगर हेच काय ते या पंचेचाळीस वर्षातलं स्थलांतर. घरात आम्ही दोघी बहिणी …

सतत घाईत असलेला मित्र!​​

आधी ‘अनसेन्सॉर्ड गप्पां’चे कार्यक्रम आणि नंतर महाबळेश्वर असे सलग सहा-सात दिवस वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, इंटरनेटपासून लांब होतो. ‘रेंज’मध्ये आल्यावर वृतपत्र पहिली तर कळलं की, मोहन हिराबाई हिरालाल याला जमनालाल बजाज सन्मान मिळाला आहे. बातमी वाचल्यावर मनाच्या गाभाऱ्यात हा आनंद सहाजिकच दाट पसरला. त्या आनंदाचा गंध वातावरणातही दरवळला. मोहनला लगेच फोन केला …

स्थित्यंतरं आणि स्थलांतरं!

(माधवबाग हॉस्पिटल्सच्या’आरोग्य संस्कार’या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख) स्थित्यंतर ही मानवी जगण्याची अपरिहार्यता आहे. त्याशिवाय जगण्यात गंमत नाही, नाट्य नाही. स्थित्यंतर म्हणजे प्रत्येक वेळी काही तरी प्रचंड मोठी उलथापालथ घडणं, असंही समजण्याचं काहीच कारण नाही; अनेकदा सध्या-साध्या रुपात ते आपल्या समोर येत असतं. स्थित्यंतर म्हणा की बदल, उत्क्रांतीच्याही स्वरूपात आपल्याला …