घुसमटलेला महाराष्ट्र !
राज्यात सध्या एक विलक्षण घुसमट निर्माण झालेली आहे. राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाने अशी घुसमट याआधी एकदाच; तीही आणीबाणीच्या काळातच अनुभवली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेनंतर मराठा समाजाचे जे लाखां-लाखांचे मोर्चे निघत आहे, केवळ त्यातूनच ही घुसमट निर्माण झालेली असं समजणं बरोबर नाही. मात्र मराठ्यांचे मोर्चे हे या घुसमटीचं …