पत्रकारच व्हायचं असं माझं कांही निश्चित नव्हतं…

■नांदेडच्या आनंद मिडियाच्यावतीनं ‘लेखणीच्या अग्रावर’ हे माझं नवीन पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे . त्या पुस्तकासाठी लिहिलेलं ‘खरं तर,’  हे मनोगत- खरं तर , पत्रकारच  व्हायचं असं मी कांही निश्चित केलेलं नव्हतं . बालपण ते वयाची तिशी हा माझा काळ अतिशय खडतर होता  , त्यातला बराचसा विपन्नावस्थेतलाही होता . …

भाजपची हडेलहप्पी !

संसदेच्या दोन्ही सभागृहात गेल्या आठवड्यात सदस्य निलंबनाची जी घाऊक कारवाई करण्यात आली त्याचं वर्णन लोकशाहीनिष्ठ नैतिकतेचा निकष लावायचा झाला तर ,  ‘सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची असंसदीय हडेलहप्पी’ याच शब्दांत करावं लागेल . भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजवर अशा निर्घृण पद्धतीनं यापूर्वी कोणताही सत्ताधारी पक्ष वागलेला नव्हता , हे आपण लक्षात घेतलं …

विधिमंडळाचं अधिवेशन ‘…नुसतंच कंदील लावणं’ होऊ नये !

हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ समाविष्ट होताना झालेल्या नागपूर कराराप्रमाणं विधिमंडळाचं नागपूरला होत असलेलं हिवाळी अधिवेशन सूप वाजण्याच्या मार्गावर असेल . हेच नाही तर  विधिमंडळाचं प्रत्येकच अधिवेशन हा आता एक सोपस्कार उरला आहे . या अधिवेशनातून भरीव असं हाती कांहीच लागत नाही . दोन-चार शासकीय विधेयकं मंजूर …

निवडणूक निकालाची आंकडेवारी आणि वस्तुस्थिती !

राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मत प्रदर्शन म्हणा की ,  राजकीय विश्लेषणाचा महापूर आलेला आहे . निकालाच्या दिवशी दुपारी चार वाजता त्या महापुरात एक ओंजळभर  पाणी टाकण्याची तत्परता आस्मादिकांनी दाखवलेली आहे . मात्र, आता सर्व आकडेवारी हाती आल्यावर या निकालाचे …

भाजपला मोठं तर काँग्रेसला थोडसं यश !

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जर राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुका सेमी फायनल ( उपांत्य फेरी ) समजायची असेल तर भारतीय जनता पक्षानं सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय संपादन केलेला आहे आणि अंतिम फेरी जिंकण्याचेही स्पष्ट  संकेत दिलेले आहे , हे मोकळेपणानं मान्य करायला हवं . पराभवाचं …

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास !

जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्थेनंतर जगाचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे .एक नवी मानवी संस्कृती आणि वर्ण व्यवस्था जन्माला आलेली आहे .जुनी बलुतेदारी जाऊन नवी बलुतेदारी अली आहे .हे सर्व बदल साहित्यिक स्वीकारत नाहीत आणि अशा साहित्यिकांनी केलेल्या जुनाट मानसिकतेच्या लेखनाला स्वीकारायला नवी पिढी तयार नाही . ■ खुली अर्थव्यवस्था आणि …

राजकारणातला सुसंस्कृतपणा गेला कुठे ?

महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकारण्यांची बेताल , असंस्कृत ‘मुक्ताफळं ‘ ऐकताना  उबग आल्यानं जे कांही आठवलं ते म्हणजे हा मजकूर आहे –  चळवळीची पार्श्वभूमी घेऊन पत्रकारितेत माझा प्रवेश झाला तो            १९७७ साली म्हणजे , त्याला आता साडेचार दशकं  पूर्ण झाली . १९१८० पासून विधीमंडळ वृत्तसंकलनाला सुरुवात झाली आणि १९८२-८३ साली ज्येष्ठ  संपादक …

बबनराव ढाकणे नावाचं वादळ

‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत…   पत्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले . १९७५ ते ९० चा तो कालखंड होता . तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते पण , सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते . भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक …

शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार – विजय जावंधिया

ज्येष्ठ सहकारी असलेल्या प्रा. डॉ . आशा देशपांडे यांचा फोन आला की , शेतकरी नेते विजय जावंधिया महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत . विजयची गळाभेट झाली . खूप वर्षांनी भेटलो . दोघांचाही गहिंवर दाटून आला . बऱ्यापैकी गप्पा झाल्या . गिले-शिकवे झाले .  मन भूतकाळात गेलं . माझी आणि …

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर  महाराष्ट्र…

राजकारणी आणि पत्रकारही सत्य सांगायला का कचरत आहेत, असा प्रश्न सध्याच्या स्फोटक वातावरणात किमान मला तरी पडलेला आहे. मराठा, धनगर, बहुजन समाजाच्या समर्थनीय आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात धरणे, बेमुदत उपोषण आंदोलनं  पेटलेली आहेत, नाशिक भागात कांदा  उत्पादक  शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे. परिस्थिती स्फोटक अस्वस्थतेच्या तोंडावर महाराष्ट्र बसल्यासारखी आहे. आरक्षणाच्या मागण्या अत्यंत …