मुद्दा , कुणी पक्ष सोडण्याचा नाही !
जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून फार काही आभाळ कोसळलं आहे , असं समजण्याचं कारण नाही कारण पक्षातरं आता भारतीय राजकारणाचा अविभाज्य अंग झालेली आहेत . एखाद्या नेत्यानं पक्षांतर केलं हा मुद्दा नसून आता तरी काँग्रेस पक्ष खडबडून जागा होणार का नाही हा खरा मुख्य मुद्दा आहे …