मनोहरपंत, तुम्ही ऐसे कैसे ज्ञानी ?

बातम्या ऐकण्यासाठी टीव्ही लावला तर शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनोहरपंत जोशी यांचं भाषण सुरु होतं. बऱ्याच वर्षानी मनोहरपंताना ऐकण्याचा योग आला म्हणून तेच चॅनेल सुरु ठेवलं. महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्तेत का आली नाही, असा प्रश्न त्यांना पडला असल्याचं मनोहरपंतानी सांगितलं आणि पुढे जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते अभ्यास करताहेत, …

केजरीवालांच्या आचरटपणाला भाजपचं मखर !

लोकशाहीतील सरकारे जशी घटना आणि कायद्याच्या चौकटीत चालतात तशीच ती शिष्टाचार, पायंडे, संकेत आणि समंजसपणानेही चालवावी लागतात. ‘मी म्हणतो तेच खरं’, ‘मला जेवढं ज्ञात आहे तेवढंच ज्ञान अस्तित्वात आहे’ असा (गोड गैर) समज आणि हेकेखोरपणा, आचरटपणा करत सरकार चालवण्याचा प्रयत्न केला की कशी नाचक्की होते याचं दर्शन नुकतंच अरविंद केजरीवाल …

​भाजपविरोधी ऐक्याच्या बाजारातल्या तुरी !

इतिहासात काय घडलं आणि दुसरी बाजू समजावून न घेता, अत्यंत घाईत निष्कर्ष काढायची उतावीळ माणसाला असणारी (इंग्रजीत याला फारच चपखल म्हण आहे- old man in hurry for…!) वाईट्ट संवय आपल्या बहुसंख्य समाज माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर चर्चा घडवून आणणारे अँकर्स, त्यात सहभागी होणारे कथित विश्लेषक, तज्ज्ञ आणि राजकीय पक्षांच्या बहुसंख्य …

दि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक !

(मामासाहेब घुमरे यांचा सन्मान करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डावीकडे डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे) (नागपूर-विदर्भाबाहेरच्या बहुसंख्य मराठी वाचक तर सोडाच मराठी पत्रकारांनाही आज वयाच्या नव्वदीच्या घरात पोहोचलेल्या एक विद्वान आणि भिडस्त मामासाहेब घुमरे यांच्याबद्दल फार कमी ज्ञात आहे. नागपूरच्या विदर्भातील ‘तरुण भारत’ या दैनिकाचे निवृत्त मुख्य संपादक दि. भा. उपाख्य …

निर्लज्जम ‘सत्ता’सुखी !

सगळ्या घरात होतात तसे सायली म्हणजे-आमच्या कन्येचे, लहानपणी आईशी रुसवे-फुगवे होत असत. ‘इतका हट्ट करतेस, लाज नाही वाटत तुला’ असं म्हणत आई रागावली किंवा रुसली की मध्यस्थीसाठी येणाऱ्या रडवेल्या कन्येला एक जालीम उपाय मी शिकवला होता- आईजवळ जायचं, तिची पपी घ्यायची आणि ‘निर्लज्जम सदासुखी’ म्हणायचं. त्या निरागस पपीत आई विरघळत …

मेरे शहर का माहोल अब सुहाना न लगे…

//१// पत्रकारितेच्या निमित्तानं नागपूरला पडाव पडल्यावर उर्दूचे जाणकार, मराठी साहित्यातील युद्ध कथांचं दालन समृद्ध करणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि महत्वाचं म्हणजे, ‘आईना-ए-गझल’ या उर्दू ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी कोशाचे कर्ते डॉ. विनय उपाख्य राजाभाऊ वाईकर यांची ओळख झाली. मी औरंगाबादचा आहे असं सांगितल्यावर त्यांच्या परिचित शैलीत राजाभाऊ म्हणाले – …

राजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ !

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा तसंच विधानपरिषदेच्या सहा आणि पतंगराव कदम यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पलूस विधानसभा या निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे त्याचं वर्णन विधिनिषेधशून्य याच शब्दात करता येईल; त्यावर अर्थातच यांना विधिनिषेध होता कधी, असा प्रश्न कुणीही विचारी आणि लोकशाहीवर निष्ठा असणारा माणसानं उपस्थित केला तर …

जयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा

//१// जयंत पाटीलांना शुभेच्छा! जयंत पाटील यांची (महा)राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एकमतानं निवड करुन राजकीयदृष्ट्या चाणाक्ष (या शब्दाला पर्याय म्हणून अनेकजण धूर्त असा शब्दप्रयोग करतात!) असल्याचं शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. जयंतरावांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जरा जास्तच वाढत चाललेली सलगी आणि ते काँग्रेसमधे जाणार या कुजबुजीला म्हणा …

आणखी किती आसारामबापू…

पत्रकारितेच्या निमित्तानं झालेल्या दिल्लीच्या वास्तव्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा अस्त तर भाजपात लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय यासह अनेक राजकीय घडामोडी आणि काही खळबळजनक घटनाही अनुभवाच्या पोतडीत जमा झाल्या . खळबळजनक घटनांत ‘तहलका’च्या तरुण तेजपाल आणि स्वयंघोषित भोंदू …

ग्रंथांचं गुणगुणणं !

आईला आम्ही माई म्हणत असू. शिक्षा करण्याची माईची संवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!); खोड्या केल्या, चूक जरा गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी चुगली केली तर पितळी पिंपातील पाण्यात उभं राहण्याची आणि तसं उभं असतांना म्हणजे, शिक्षा भोगताना एखादं पुस्तक मोठ्या आवाजात वाचण्याची सक्ती असे. शिक्षेची तिनं ठरवलेली मुदत संपण्याआत …