कॉपी, तेव्हा आणि आताही!

दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या की कॉपीच्या बातम्याचं पीक बहरात येतं. या वर्षी या बातम्या वाचतांना आणि पाहतांना स्वानुभव आठवला आणि या पिकाला मरण नाही कायम भाव आहे याची खात्री पटली. पत्रकारितेत आलो तरी १९९८ पर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि अधुनमधून कॉपी हा केवळ बातमीचा विषय होता; तोही दुरुनच. …

एका गांधीवाद्याचा अलक्षित मृत्यू …

वसई-विरार पट्ट्यातल्या दहशतीच्या विरोधात आदिवासींच्या बाजूने बेडरपणे आवाज उठवणारा सामाजिक कार्यकर्ता, माजी आमदार, मित्रवर्य विवेक पंडित याचा गेल्या आठवड्यात फोन आला. त्यानं विचारलं, ‘बाबा (म्हणजे मोरेश्वर वडलकोंडावार) बद्दल कळालं का?’ ‘नाही’ म्हणून सांगितल्यावर विवेक म्हणाला, ‘बाबा वारला’. ‘काय सांगतोस, कधी?’ मी विचारलं. त्यावर विवेक उत्तरला, ‘आठ-दहा दिवस होऊन गेले आता. …

फडणवीसांची बोलाची कढी अन बोलाचाच भात!

नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन आणि ​मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या राज्य सरकारनं केलेल्या अनेकपानी जाहिराती वाचनातांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या राज्याच्या हिताची कळकळ, त्यांची विकासाची असणारी दूरदृष्टी, ते घेत असलेले अविश्रांत श्रम, त्यासाठी क्वचित स्वत:चा जीव धोक्यात घालून सतत करत असलेला प्रवास, याच काळात त्यांचं ‘पोलिटिकली करेक्ट’ असणं आणि कायम असलेली …

कॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना पंतप्रधानांनी संसदेत आणि राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात करावयाच्या भाषणात सरकारच्या कामाची भविष्यातील दिशा काय राहील, सरकारच्या काही धोरणात्मक बाबींचा उहापोह, काही संभाव्य समाजहितैषी योजना यावर भर देणं अपेक्षित असतं; तशी भारतीय सांसदीय लोकशाहीची ती परंपराही आहे. अशा भाषणात विरोधकांना एखाद-दुसरा टोला लगावला …

साहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं!

आपल्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण काय तर, प्रत्येक बाबींला विरोध करणं किंवा त्याबाबत वाद घालणं. वर्षारंभी नवीन वर्ष इंग्रजी पद्धतीनं साजरं करावं की नाही, येथपासून हा विरोध म्हणा की वाद सुरु होतो आणि डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याऐवजी तो पैसा विदर्भाच्या विकासासाठी खर्च करावा… असा वर्षभराचा, कोणताही विषय-पक्ष-विचार वर्ज्य …

प्रिय राणी आणि अभय बंग

राणी आणि अभय या डॉक्टर बंग दांपत्याला पद्मश्री हा सन्मान जाहीर झाल्याचं कळल्यावर आनंदाचे कल्लोळ भेटीला आले; त्याची अनेक जीवाभावाची कारणं आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यात प्रांजळ मैत्री आहे. त्यातही अभयशी जास्त संपर्क असतो. अकृत्रिम मैत्रीचे हे बंध आमच्या पुढच्या पिढीतही कायम आहेत. राणी आणि अभय या बंग डॉक्टर दांपत्याच्या, …

तोगडियांचे नकाश्रू…

विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांना प्रकाश वृत्त वाहिन्यांवर ‘लाईव्ह’ अश्रू ढाळतांना पाहिल्यावर या माणसात कोडगेपणा खच्चून भरलेला आहे याची खात्री पटली . राम मंदिराच्या उभारणीसाठी आधी विखारी धर्मांध चळवळ आणि नंतर त्यापेक्षाही जास्त विखारी आंदोलन करतांना मरण पावलेल्या किंवा गुजरातेत झालेल्या दंगलीत बळी पडलेल्या कोण्याही जाती-धर्माच्या माणसाच्या …

अविवेकाचा धुरळा !

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन पांचव्या मुख्य न्यायमूर्तींच्या संदर्भात जी काही परिस्थिती कथन केली ती जितकी चिंताजनक आहे, त्यापेक्षा जास्त त्यानिमित्तानं उडालेला अविवेकाचा धुरळा अस्वस्थ करणारा आहे. आपल्या देशाच्या कनिष्ठ ते अगदी सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘ऑलवेल’ नाही, याचे अनेक संकेत आणि दाखले यापूर्वीही मिळालेले …

लालुंचा हुच्चपणा!

चारा घोटाळ्यात आतापर्यंत दोन खटल्यात लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा झालेली आहे. तिसऱ्या खटल्याचा निकाल या महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे, अशा बातम्या वाचनात आल्या आहेत. तो निकाल लागल्यावरही चारा घोटाळा प्रकरणातील अजून तीन खटले बाकी आहेत. पहिला निकाल लागला तेव्हा केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचं सरकार होतं तर …

भीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे

// एक // आधी भीमा कोरेगावला मग त्याची प्रतिक्रिया म्हणून राज्यभर जे काही प्रतिसाद उमटले त्यावरून आपल्या राज्याचं पोलीस दल समाज मनाची नाडी ओळखण्यात कसं थिटं पडलं आहे , हे विदारकपणे समोर आलेलं आहे . गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती , त्यासाठी गावोगाव बैठका घेतल्या जात होत्या …