चिंतन आत्मरुदन ठरु नये…
उशिरा सुचलेलं शहाणपण अशा शब्दात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या चिंतन शिबिराचं वर्णन करायला हवं . देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची नौका डळमळायला सुरुवात झाली ती २०११पासून . झाले न झालेले अनेक आर्थिक घोटाळे , अण्णा हजारे यांचं दिल्लीतलं आंदोलन ही त्या डळमळण्याची सुरुवात होती . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून स्वीकृती …