नाठाळ नोकरशाहीला वेसण हवी(च)

भगवान सहाय या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या तथाकथित असंवेदनशील वर्तनाबद्दल गेल्या आठवड्यात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळात आंदोलन केलं. सहाय असंवेदनशील वागले असतील तर त्याचं मुळीच समर्थन नाही पण, त्याची खातरजमा न करता, चौकशी न करता काम सोडून आंदोलन करणं ही कृती शिस्तभंगाची नाही काय ? अधिकाऱ्याचे वर्तन एकतर्फी असंवेदनशील ठरवून कामासाठी …

गावाकडचा ‘हरवलेला’ गणपती…

औरंगाबाद जिल्ह्यातलं कन्नड तालुक्यातलं अंधानेर, वैजापूर तालुक्यातलं लोणी आणि खंडाळा, बीड जिल्ह्यातलं नेकनूर, पाटोदा, डोंगरकिन्ही, धोंडराई… यापैकी एकही आमचं मूळ गाव नव्हे पण, आईच्या (तिला आम्ही माई म्हणत असू) नोकरीच्या निमित्तानं या गावात (त्यातही अंधानेरला जास्त) आमचं वास्तव्य झालं. माई नर्स होती. त्या काळात ग्रामीण भागात वैद्यकसेवा दुर्लभ होती. नर्स …

आमदारांविरुद्ध मतलबी ओरड !

विधि मंडळाच्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते वाढल्यावर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मिडियात अशा काही प्रतिक्रिया व्यक्त होताहेत की, जणू काही आधीच मवाली असलेल्या आमदारांनी, कुणाचा तरी खून करून राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. अर्थात, ही भावना निर्माण करण्यास बहुसंख्य राजकारण्यांचे शिसारीसदृश्य पंचतारांकित राहणीमान, सप्ततारांकित मग्रुरी आणि राजकारणाचं झालेलं बाजारीकरण जबाबदार …

वेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं!

मावळत्या आठवड्यात स्वतंत्र विदर्भाचं तुणतुणं वाजवण्याचा (वार्षिक) राजकीय उपचार पुन्हा एकदा पार पडला. सत्ताधारी किती उतावीळ आणि विरोधी पक्ष किती अदूरदर्शी आहे, हेच त्यातून दिसलं. भाजप-सेना युतीच्या अर्ध्या मंत्रीमंडळावर एका पाठोपाठ भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी नेत्यांकडून झालेले आहेत. आर्थिक घोटाळ्यांच्या आघाडीवर ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ आरोपींच्या पिंजऱ्यात उभी केली गेली; कॉंग्रेस आणि …

राजकारण्यांचे ‘तेव्हा’चे डब्बे…

विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘कुजबुज’ हा स्तंभ प्रकाशित होतोय. त्यात लोकप्रतिनिधींच्या खाद्यप्रेमाची महती सांगणारा ‘‘डब्बा’ ऐसपैस’ मजकूर प्रकाशित झालाय. ही कुजबुज कोणी केलीये त्याचं नाव दिलेलं नाहीये पण, निर्दोष भाषा तसंच शैली आणि संदर्भ लक्षात घेता हा मजकूर आमच्या पाठच्या पिढीचा पत्रकार संतोष प्रधान याचाच असणार याची खात्री आहे. …

उडता पंजाब !

स्वामीप्रसाद मौर्य यांनी बसपाचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं जसं बिगुल फुंकलं तस्सच, फटकेबाजीसाठी ओळखला जाणाऱ्या जिगरबाज माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धूनं भाजपनं दिलेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पंजाब विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाची सुरुवात केलीये. थोडंस विषयांतर करून सांगायचं तर, सिद्धूनं राज्यसभा सदस्यत्व आणि भाजप सोडण्याच्या निर्णयाचं दिल्लीच्या राजकारण्यांना आणि विविध माध्यमातील …

‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’

सकारात्मक, विधायक काही घडत नाही, शहरी आणि त्यातही प्रामुख्यानं, मध्यमवर्गीयांची संवेदनशीलता हरवत चालली आहे, नमस्कार करावा अशी पाऊलेच दिसत नाहीत, आजची तरुण पिढी चंगळवादी झालीये, वाचन संस्कृती लोप पावते आहे… वगैरे खंत नेहेमीच कानावर पडते. प्रत्यक्षात शंभर टक्के तसं काहीच नसतं, नाहीच. समाजात खूप काही चांगलं घडत असतं पण, ते …

निवडणुकांची नांदी !

चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार आणि फेरबदल असा घाट नुकताच घातला. मंत्री मंडळातील पाच जणांना वगळत त्यांनी प्रकाश जावडेकरांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली आणि १९ नव्या चेहेऱ्याना राज्यमंत्रीपदाची मनसबदारी बहाल केली. येत्या सहा-साडेसहा महिन्यात निवडणुका लागणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि …

छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…

पंतप्रधान न होऊ शकलेले ; गेला बाजार राज्यात स्वबळावर सत्ता संपादन न करू शकलेले आणि संयमी, विचारी, मनात काय चाललंय याची पुसटशीही चुणूक चेहेऱ्यावर उमटू न देण्याचं कौशल्य असणारे, ‘जाणता राजा’ अशी प्रतिमा असणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा छत्रपती-पेशवे म्हणजे ‘मराठा-ब्राह्मण’ वाद उकरून काढला आहे. स्वत: इतकी दशकं सत्तेत …

‘गोड’ ग्लानीतले कॉंग्रेसजन…

‘सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असून, हा पक्ष कधीच संपणार नाही’, असं पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी इथं झालेल्या युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करतांना राज्याचे माजी सहकार मंत्री, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले असल्याची बातमी वाचली आणि कॉंग्रेस नेते गोड गैरसमजाच्या ढगात राहतात याची खात्री पटली. हर्षवर्धन पाटील …