माणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…

१९७२चा दुष्काळ अनुभवलेल्या पिढीतील मी एक आहे. अंग भाजून काढणारी उन्हें, सतत कोरडा पडणारा घसा, कधी तरी मिळणारे अत्यंत गढूळ पाणी, खायला अमेरिकन लाल मिलोच्या भाकरी, मिलो मिळणे मुश्कील झाल्यावर राज्य सरकारने सुरु केलेले सुकडी हे खाद्यान्न, रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडी फोडणारे लोक आणि याच खडीचे ओळीने रस्त्यालगत लागलेले ब्रास… …

जबाबदारी विसरलेले विरोधक

‘संत शिरोमणी’ जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गैरवर्तन केले म्हणून त्यांना या अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी पूर्ण अधिवेशनभर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, नंतर आव्हाड यांचे निलंबन रद्द होताच बहिष्कार मागे घेतला. सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एका सदस्याने केलेल्या गैरवर्तनाचे समर्थन महत्वाचे वाटते हा संदेश या …

दुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच!

विकासाचा तालुकावार अनुशेष निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केळकर समितीच्या (अद्याप जाहीर न झालेल्या) अहवालाच्या निमित्ताने एबीपी माझा वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत माझे मित्र, नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी, ‘आता खूप झाले. विकास व्हायचा असेल तर महाराष्ट्रातून स्वतंत्र होणे हाच विदर्भासमोर उरलेला पर्याय आहे’, असे प्रतिपादन सवयीनुसार केलेच. भारतीय जनता …

दर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा!

गेल्या डिसेंबर महिन्यातील घटना- काही कामांसाठी औरंगाबादला आलो होतो. दुपारी सिडको परिसरातील एक रेस्तराँत काही डॉक्टर मित्रांसोबत जेवायला गेलो असताना राजकीय गप्पा सुरु झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघातून दर्डा यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा होती. तेव्हा मी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून दिल्लीत पत्रकारिता करत होतो. अचानक तो …

काँग्रेस पतनाचे नायक!

विधान सभेचे निकाल लागल्यापासून माध्यमांचा रोख शिवसेना-भारतीय जनता पक्षात होणारी किंवा न होणारी युती, शरद पवार यांची खेळी आणि या आभासी युतीतील रुसवे-फुगवे या भोवती केंद्रीत राहिला. अल्पमतातील भाजप सरकारने विधानसभेत संपादन केलेले विश्वासमत(?) आणि त्याची वैधता याचा तडका मध्यंतरी त्यावर मारला गेला. ही युती होईल किंवा नाही आणि झाली …

पद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….

नागपूरच्या नीरी, सेंट्रल जेल, लक्ष्मीनगर, दीक्षा भूमी, मुंडले तसेच कुर्वेज शाळा, अंध विद्यालय आणि विदर्भ वैधानिक मंडळाचे कार्यालय यांच्या बेचक्यामध्ये असलेल्या गच्च झाडीत वसंत नगर नावाची म्हाडाची चाळीस-एक वर्ष जुनी कॉलनी वसलेली आहे. वसंत नगरमध्ये प्रवेश केला आणि सरळ थेट आत गेलं की एका मोठ्या मैदानाच्या तोंडाशी समोर ‘डेड एंड’ …

मोदींची तिरकी चाल…

अपेक्षेप्रमाणे राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी पुरस्कृत सरकार विधानसभेत आवाजी बहुमत प्राप्त करते झाले आणि त्याहीपेक्षा जास्त अपेक्षेबाहेर हे बहुमत मिडियात गाजले! इतके की, या आवाजात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले या घटनेच्या राजकीय पैलूकडे मात्र दुर्लक्ष झाले. एक लक्षात घ्यायला हवे …

‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध !

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील ‘एमआयएम’ या अल्पाक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या ‘मजलिसे इत्तिहादुल मुसलमिन’ने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीने काहींच्या नजरा उंचावल्या आहेत तर मराठवाड्यातील बुद्धिवंत, समाजचिंतक, पत्रकार आणि आज वयाची साठी पार केलेल्यांच्या नजरा भयकंपित झालेल्या आहेत. ‘एमआयएम’ने राज्यात दोन जागी विजय संपादन केला आहे, ११ विधानसभा मतदार संघात हा पक्ष दुसऱ्या …

देवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…

शिवसेनेचे ‘बडी बेआबरू हो के तेरेही कुचे मे लौट आये…’ अखेर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एका शानदार समारंभात शपथ घेतली. ‘अखेर’ हा शब्दप्रयोग यासाठी की, निवडणुका लागल्यापासून ते शपथविधी समारंभापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना नेते या समारंभाला उपस्थितीत राहतात किंवा नाही याबाबत सस्पेन्स कायम होता. …

निराशा तरी… आशाही!

(हा मजकूर आत्मरुदन किंवा आत्मपीडन नाही तसेच, हा परपीडेतून आनंद घेण्याचाही प्रयत्न नाही तर, एक भूमिका घेऊन मी ज्या व्यवसायात सुमारे साडेतीन दशकापेक्षा जास्त काळ आनंदाने घालवत आहे त्या पत्रकारितेचा घेतलेला आत्मपरीक्षणात्मक वेध आहे. या लेखनाचा रोख प्रामुख्याने प्रकाशवृत्त वाहिन्या, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील साखळी आणि विभागीय पातळीवरील मध्यम वृत्तपत्रांकडे …