आप’भी हमारे नही रहे !

आम आदमी पार्टीने केलेल्या सर्वसामान्य माणसाच्या राजकीय अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त करणारा ‘जिस का डर था वही हुआ, ‘आप’भी हमारे नही रहे !’ हा लघुसंदेश दिल्लीच्या वर्तुळात मध्यंतरी जोरदार फिरला. साठी-सत्तरीतले औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य पॉलसर उर्दू साहित्यात ख्यातकीर्त होते आणि त्यांच्या एकेकाळी गाजलेल्या ‘जिस का डर था वही हुआ, …

मुंडेंनंतरचा गेम चेंजर कोण ?

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हे एक न पचवता येणारे असले तरी सत्य आहे. गेल्या साडेतीन दशकात मुंडे काही केवळ एका अपक्षांचे नेते म्हणून महाराष्ट्रात स्थिरावले नव्हते तर एकाच वेळी ते राज्यातील बहुजनांचे आधार आणि पक्षाचा चेहेरा बनलेले होते. एक वाळकी काडी तोडता येते पण, अशा काड्यांची मोळी बांधली तर ती मोळी एक ताकद …

मुंडे नावाचा झंझावात थांबला..

मुंडे नावाचा झंझावात थांबला … मृत्य अटळ आहे असे कितीही समर्थन केले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित मृत्यूचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही . वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात असंख्य वादळांना कधी बेडरपणे, कधी समंजसपणे , कधी सोशिकपणाने तर कधी जाणीवपूर्वक सोशिकपणाने सामोरे गेलेल्या मुंडे यांचा मृत्यू एका अत्यंत किरकोळ …

नितीन गडकरींची चुकलेली वाट!

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अखेर शपथ घेतली आणि स्वत:ची वाट स्वत:च चुकवून घेतली. मुळात नितीन गडकरी काही दिल्लीच्या दरबारात जन्मलेले आणि मग राष्ट्रीय नेते झालेले नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रात एक आमदार म्हणून सुरु झाली. राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार सत्तारूढ …

काँग्रेसमधली संधीसाधू गुलामगिरी !

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांचे दिलेले राजीनामे अपेक्षेप्रमाणे स्वीकारले गेले नाहीत आणि गांधी घराणे वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेतृत्व करण्यास लायक नाही हा संदेश पुन्हा एकदा जनतेत गेला. मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे २०६ सदस्य होते ती संख्या …

मोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा !

भारतातल्या मतदारांनी १६व्या लोकसभेसाठी जनमताचे कौल आजवर जाहीर झालेले सर्व कौल थिटे आहेत हे सिद्ध करत ‘मोदी सरकार’ स्थापन होण्यासाठी निर्विवाद कौल दिला आहे. १९८४ नंतर देशात प्रथमच एका पक्षाला केंद्रात सरकार चालवण्यासाठी जनतेचा पूर्ण विश्वास प्राप्त झाला आहे . हा कौल एकट्या भारतीय जनता पक्षाला आहे आणि पूर्ण बहुमतापेक्षा …

पंतप्रधानपद..जात्यंधता आणि मुलायमसिंह

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या चर्चा आहे ती केवळ निवडणुकीची आणि उत्सुकता आहे ती निकालाची. दिल्लीत नेहेमीच चर्चा आणि वावड्यांना ऊत आलेला असतो. यासाठी वेळ-काळ आणि ऋतुंचे बंधन तसेही नसतेच. राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची निवासस्थाने किंवा ही कार्यालये आणि निवासस्थाने असलेल्या परिसराच्या आसपासच्या बारमध्ये एखादी चक्कर टाकली की अनेक अफवा-गॉसिप-वावड्या; काही म्हणा …

भाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती ?

आमचा गेल्या ३५-३७ वर्षांचा घनिष्ठ स्नेही आणि डॉक्टर श्याम पितळे गेल्या अनेक वर्षापासून सकाळी सायकलिंग करत दररोज त्याच्या सख्ख्या एक-दोन मित्र किंवा नातेवाईकाकडे जातो. त्या घरातल्या आरोग्यविषयक किरकोळ तक्रारींचे निवारण करतो, गरज असेल त्याचा रक्तदाब बघतो, ज्या काही सूचना आवश्यक असतील त्या देतो, आवश्यकता असेल तर सुरु असलेल्या औषधांचे डोज …

उड गया ‘राजहंस’ अकेला …

‘नागपूर पत्रिके’तल्या दिवसांचं नातं ज्या अनेकांशी घट्ट जोडलेलं आहे त्यातल्या रमेश राजहंस यांच्या निधनाची बातमी अनपेक्षितच. त्या दिवसातल्या दिनकर देशपांडे, हरिहर येगावकर, शरद देशमुख असे काहीजण मृत्यू नावाच्या अज्ञाताच्या प्रदेशात निघून गेले आहेत, त्यात आता रमेश राजहंस यांची भर पडली आहे. नागपूरच्या पत्रकारितेतला माझा पहिला पडाव नागपूर पत्रिकेत पडला आणि रमेश …

कोण हे अमित शहा ?

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा …