बिहारी फटाके !

निवडणुका जाहीर होण्याआधी आणि दिवाळी बरीच दूर असताना बिहारात फटाके फुटायला लागले आहेत. अर्थातच हे फटाके राजकीय आहेत. विकासाचे तथाकथित गुजराथी मॉडेल घेऊन देश चालवणारे नरेद्र मोदी आणि सर्वच बदलौकिकाच्या गटारगंगेतून बिहारला शुद्ध करणारे नितीशकुमार हे दोघे सध्या राजकीय फटाके फोडण्यात आघाडीवर आहेत आणि बिहारातील लढाई या दोघातच झाडणार आहे. …

कर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण !

‘मेरी मुर्गी की एकही टांग’ अशी एक म्हण लहानपणी मराठवाड्यात अनेकदा ऐकायला मिळायची, या म्हणीचा अर्थ ‘माझंच म्हणणं खरं आणि त्यासाठी कितीही एकारली भूमिका घेण्याची वृत्ती’ असा होता. याच वृत्तीची लागण आपल्या देशाच्या पुरोगामी-प्रतिगामी, डाव्या-उजव्या, सरळ-वाकड्या अशा वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालणाऱ्या बहुसंख्याना झालेली आहे, किंबहुना आपल्या देशातील राजकारणाचे ते एक …

दिलखुलास आणि ऐटदार गवई…

सत्तेच्या दालनात प्रदीर्घकाळ पत्रकारिता करताना अनेक नेत्यांना भेटता आलं.त्यात रा. सू. गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर सर्वात प्रथम आठवला तो त्यांचा पानाचा डबा.. लगेच त्यातील केशराचा गंधही दरवळला. रा. सू. गवई यांचा लवंग, विलायची, जर्दा, केशर असलेला पानाचा …

उपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव !

एखाद्याच्या पराभवातही अशी विजयाची ऐट असते की आपण आचंबित; क्वचित नतमस्तकही होतो आणि काहींचा विजयही उपेक्षेचा धनी ठरतो. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४) हे देशाच्या राजकारणातील अशाच उपेक्षेचे नाव. एका मुलग्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘हैदराबादेतील बंजारा हिल्स भागातील मालमत्ता विकावी, अन्य कोणाकडूनही मदत …

एक वर्षापूर्वी आणि नंतर…

(सर्व परिचित वाचक चळवळ ग्रंथालीचे मुखपत्र असलेल्या ‘शब्दरुची’ या मुखपत्राच्या मे २०१५च्य अंकाचा अतिथी संपादक मी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एक वर्ष ही या अंकाची थीम आहे. या अंकासाठी मी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग- चित्र संकल्पना : विवेक रानडे ) मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार पायउतार …

राणे नावाची महाशोकांतिका…

शेवटच्या टप्प्यात काही प्रकाशवृत्त वाहिन्यांचे काही पत्रकार आणि त्या वाहिन्यांवरचे काही तथाकथित राजकीय विश्लेषक यांचे ‘विशफूल थिंकिंग’ वगळता अपेक्षेप्रमाणे बांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नारायण राणे दणकून हरले. शेवटच्या टप्प्यात या वाहिन्यांनी ‘राणे जोरदार टक्कर देणार’, ‘कदाचित ते विजयी होणार’, असे जे ‘हाईप’ केले त्यामागची कारणे काहीही असोत पण, दस्तुरखुद्द …

फडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा!

पत्रकारितेत १९७८ साली आल्यानंतर नागपूर शहरात २६ वर्ष वास्तव्य झाले. या शहराने वार्ताहर ते संपादक असा माझा प्रवास पहिला. सुख-दुखाच्या क्षणी या शहराने भावना मोकळ्या करण्यासाठी मला आधार दिला. हे शहर, तेथील अगणित भली-बुरी माणसे, रस्ते, झाडे, अनेक संस्था, वास्तू, असह्य टोचरा उन्हाळा, बोचरी थंडी, बेभान पाऊस… इत्यादी इत्यादी माझ्या …

कारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख

औरंगाबाद महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी आलेल्या राज ठाकरे यांची भेट झाली. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या. मी म्हणालो, ‘फार उशीर केला तुम्ही औरंगाबादची निवडणूक लढवण्यासाठी यायला. या शहराची वाट लावली आहे. एके काळी टुमदार आणि देखणं असणारं हे गाव बकाल करून टाकलंय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा-बारा वर्षात’. राज ठाकरे म्हणाले, ‘म्हणूनच नाही …

कलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नाही हे काही आता लपून राहिलेले नाही. या सरकारातील मुख्यमंत्र्यासकट सर्वांनीच अंतर्गत धुसफुस म्हणा की नाराजी वेळोवेळी जाहीर करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. भाजपातील एकनाथ खडसे या ज्येष्ठ मंत्र्याने लाख्खो मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठोबा-रुखमाईच्या आरतीनंतर मुख्यमंत्रीपदी बहुजनांचा प्रतिनिधी (म्हणजे …

डिलीट न होणारी माणसं…

एक म्हणजे, दैववादी किंवा नियतीवादी नसल्याचा तोटा काय असतो तर, आर आर पाटील यांच्या मृत्यूचे समर्थन करता येत नसल्याने त्याचे खापर कोणावर तरी फोडून मोकळे होता नाहीय. दुसरे म्हणजे, हे विधान करत असतानाच हेही स्पष्ट केले पाहिजे की, मी काही आरआर यांच्या खास वगैरे वर्तुळात नव्हतो. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी …