बंड…एक फसलेलं आणि एक अधांतरी !

■‘मीडिया वॉच’च्या २०२२च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख ■ महाराष्ट्राच्या राजकारणातली बंड म्हणा की, फूट माझ्या पिढीच्या पत्रकारांना नवीन नाहीत. १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि महाराष्ट्र काँग्रेसमधलं पहिलं बंड १९७८ साली शरद पवार यांनी घडवलं. १२ आमदारांसह बाहेर पडून शरद पवार यांनी महाराष्ट्रातलं सिंडिकेट काँग्रेस आणि इंडिकेट काँग्रेसचं वसंतदादा पाटील …

केशवराव धोंडगे – ‘मन्याड’चा थकलेला वाघ !

( छायाचित्र – महात्मा गांधी मिशन रुग्णालयात केशवराव धोंडगे , सोबत  त्यांच्या पत्नी सौ . प्रभावती . ) जाणीव-नेणिव आणि स्मरण-विस्मरणाच्या सीमा रेषेवर असलेल्या वयोवृद्ध केशवराव धोंडगे यांची नुकतीच भेट झाली . महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणारे केशवराव धोंडगे यांचं वय १०५ …

काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य  ठरवणारी पदयात्रा…  

काँग्रेस पक्षाच्या नवीन ( आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या असलेल्या) अध्यक्षाच्या निवडणुकींच्या हालचालींनी  वेग  घेतलेला असतांना हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेला पंधरवडा उलटलेला आहे . उल्लेखनीय बाब म्हणजे , या पंधरा दिवसांत तरी कष्टकरी-कामकरी , सर्वसामान्य आणि विशेषत: युवकांमध्ये या यात्रेविषयी मोठं …

निवडणूक चिन्हांबद्दल बोलू कांही…

‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार , यावरच्या अटकळी आणि पैजा सध्या जोरात आहेत . समाज माध्यमांवरचे राजकीय विश्लेषक (?) आणि घटनातज्ज्ञ (?) त्यावर हिरिरीनं  व्यक्त होत आहेत . हे प्रकरण सध्या निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असतानाच शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली . वस्तुत: …

मिथकात अडकलेले उद्धव ठाकरे…

महाराष्ट्रात सत्तांतर झालं . काहींना त्याचा आनंद झाला , काहींना ते फारच झोंबलं . अनेकांना ते सत्तांतर ज्या पद्धतीनं घडलं ते मुळीच रुचलं नाही . त्या सत्तांतराच्या संदर्भात अगदी घटना तज्ज्ञ ते फेसबुकीय राजकीय  तज्ज्ञांनी   मतं-मतांतरं व्यक्त केलेली आहेत . सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्री आहेत . राष्ट्रपतीपदाची निवडणूक …

विलासराव-गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजकारणात मराठवाडा पोरका…  

■ औरंगाबादच्या ‘आदर्श गावकरी’ या दैनिकांचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . त्यानिमित्ताने ‘आदर्श गावकरी’ने एक विशेष पुरवणी प्रकाशित केली . त्या पुरवणीत पत्रकार उद्धव भा . काकडे यांनी मराठवाड्याच्या विद्यमान राजकीय  परिस्थितीच्या संदर्भात घेतलेली ही माझी मुलाखत -■ शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची पार्श्‍वभूमी होती. त्यानंतर विलासराव देशमुख, गोपीनाथ …

शिवसेना कुणाची : ठाकरे का शिंदेची ?

■ परत येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एकनाथ शिंदे यांनी अजून तरी माघार घेतलेली  नाही , हे गृहीत धरुन हा मजकूर लिहिलेला आहे . ■ हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा शिवसेनेतील सत्ता संघर्ष सुरु होऊन सुमारे एक आठवडा झालेला असेल.  हा संघर्ष आता शिवसैनिकांना मान्य असणारी आणि केवळ ठाकरे कुटुंबीयांचं नेतृत्व …

महाविकास आघाडीचं गर्वहरण !

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार विजयी होणं म्हणजे , राज्यातील सत्ताधारी आघाडीचं गर्वहरण होणं आहे . पसंती क्रमानं होणारी निवडणूक म्हणजे बाष्कळ बडबड नसते तर ती निवडणूक जिंकण्यासाठी भिंत बांधताना जशी एकेक वीट रचायची असते त्याप्रमाणे एकेका मतांची विचारपूर्वक तजवीज करायची असते , हा धडा या निकालातून …

चिंतन आत्मरुदन ठरु नये…

उशिरा सुचलेलं शहाणपण अशा शब्दात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या  चिंतन शिबिराचं वर्णन करायला हवं . देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची नौका डळमळायला सुरुवात झाली ती २०११पासून . झाले न झालेले अनेक आर्थिक घोटाळे , अण्णा हजारे यांचं दिल्लीतलं आंदोलन ही त्या डळमळण्याची सुरुवात  होती . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून स्वीकृती …

राजद्रोहाचं राजकारण !

खासदार  नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचं समर्थन करता येणार नाही , असं गेल्या स्तंभात जे म्हटलं होतं तसंच निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे ; हे निरीक्षण निकालात उमटतं का त्यावर लक्ष ठेवायला हवं . देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार …